आयुष्यात कोण येणार
हे वेळ ठरवते
आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे
हे हृदय ठरवते.
आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार हे मात्र
आपला स्वभाव ठरवतो
फसवून प्रेम कर,
पण प्रेमात फसवू नकोस
हृदय तोडून प्रेम कर
पण प्रेम करून हृदय तोडू नकोस
विचार करून प्रेम कर
पण प्रेमात विचार करू नकोस.
इथे सुरू होण्या आधी
कहाणी संपते
साक्षीला केवळ उरते
डोळ्यातील पाणी
हात तुझा तुझ्या हाती घेता
काहीच फरक नाही पडला
मृत्यू उभा माझ्या दारी होता
बिस्स हात तुझा हाती होता
साथ सोडून जायचच असेल तर
हात पुढे करूच नकोस
मनातून नंतर उतरायचे असेल तर
मनात आधी भरूच नकोस
प्रत्येक गोष्ट हृदयाचं जवळ नसते
जीवन हे दु:खापासून लांब नसते
आपल्या मैत्रीला जपून ठेवा
कारण ही एक अशी गोष्ट आहे
ती प्रत्यकाच्या नशिबात नसते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा